अडीच हेक्टर क्षेत्रात लागवड केलेली ज्वारी (विराट) वाणाची ज्वारी मध्ये कणसच भरली नाही.

अडीच हेक्टर क्षेत्रात लागवड केलेली ज्वारी (विराट) वाणाची ज्वारी मध्ये कणसच भरली नाही.
शेतकरी डॉ. विजयकुमार देशमुख यांची लेखी तक्रार कृषी विभागामार्फत पंचनामा
शेतकऱ्याला भरपाई केव्हा मिळणार?
भडगाव-प्रतिनिधी
भडगाव येथील प्रगतशील शेतकरी डॉ.विजयकुमार नानासाहेब देशमुख यांची वलवाडी ता.भडगाव या शिवारात गट क्रमांक ८० मध्ये अडीच हेक्टर शेत जमीन आहे. या जमिनीत मातोश्री ऍग्रो एजन्सी भडगाव यांच्यामार्फत रब्बी ज्वारी (विराट) या वाणाची कंपनी नाव कारसावी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडील बॅच नंबर ४२२ यामध्ये एकूण आठ बॅग खरेदी करून लागवड केली होती यावर वेळोवेळी त्यास खत आणि पाणी दिले परंतु काही दिवसानंतर असे निर्दशनास आले की सदरील वाणाच्या कंसामध्ये पूर्ण दाणे भरलेले नाही. म्हणून कारसावी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शेतकरी डॉ.विजयकुमार नानासाहेब देशमुख यांचे यावर्षीचे उत्पन्न कमी येईल व अतोनात नुकसान झाले असून याबाबत त्यांनी लेखी तक्रार करून त्वरित पंचनामा करावा अशी लेखी तक्रार कृषी विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत कृषी अधिकारी एस.व्ही.कराड, तालुका कृषी डी.आर.तांबे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आय.बी.देशमुख, कंपनी प्रतिनिधी रोहिदास माळी,विक्रेता एकनाथ पाटील व तक्रारदार शेतकरी डॉ. विजयकुमार देशमुख यांच्यासमोर पंचनामा झाला.या पंचनामांमध्ये कृषी विभागाने शेतकऱ्याचे ५० टक्के नुकसान झालेले आहे असा पंचनामा केला आहे. परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्याला कुठलाही मोबदला भेटलेला नाही तरी तो मोबदला त्वरित मिळावा अशी मागणी होत आहे.