Other

Dark Wednesday : आगीच्या भीतीने घेतला १० रेल्वे प्रवाशांचा बळी?

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते शिरसोली दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या मारल्या. परंतु समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवलं असून या रेल्वेखाली आल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. मृतकांचा आकडा १० सांगण्यात येत असून प्रशासनाने धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशन जवळ पुष्पक एक्सप्रेस पाचोराच्या दिशेने येत असताना ५ वाजेच्या सुमारास रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरली. आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या मारल्या. परंतु समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवले. या घटनेत ८ ते १० जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, रेल्वेचे अधिकारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.

जखमींना कर्नाटक एक्सप्रेसने जळगावला हलविण्यात आले असून शक्य ती सर्व मदत पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button