PoliticsSocial

महायुती झाली… पण भाजप ‘बॅकफुट’वर..

महायुती झाली… पण भाजप ‘बॅकफुट’वर..

राष्ट्रवादीच्या प्रवेशाने जळगाव मनपातील समीकरणे बदलणार !

जळगाव विशेष प्रतिनिधी  महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली असून जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आले असून महायुती करण्यावर शिक्का मोर्तब झाले आहे. मात्र या निवडणुकीसाठी जागा वाटपाचा तिढा कायम असून एक-दोन दिवसात हा तिढा सुटून याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपला 46 शिवसेना शिंदे गटाला 22 तर राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळू शकतात.

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांच्या नेत्यांमध्ये उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे प्रभारी आमदार मंगेश चव्हाण, प्रमुख आमदार राजू मामा भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री अनिल पाटील, दीपक सूर्यवंशी अभिषेक पाटील आदी उपस्थित होते.

मागील निवडणुकीत भाजपने 57 जागा जिंकून सत्ता प्रस्थापित केली होती. मात्र महायुतीतील घटक पक्षांनी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर भाजप आता बॅक फुटवर आले असून त्यांना 50 पेक्षा कमी जागांवर उमेदवार उभे करावे लागणारा असल्याचे चित्र दिसून आहे. तसेच जळगाव महापालिकेवर एक हाती सत्ता भाजपला मिळवणे यंदा कठीण जाणार आहे. जळगाव शहरात शिवसेनेला मानणारा एक मोठा वर्ग असल्याने शिवसेना व राष्ट्रवादी या दोघांना हाताशी धरून भाजपने दोन पावले मागे घेतली असल्याचे बोलले जात आहे.

सुरुवातीला भाजपाने शिवसेना शिंदे गटाचे 55 आणि 25 अशा जागा वाटपाबाबत निर्णय ठरला होता मात्र राष्ट्रवादीच्या महायुती प्रवेशाने अंतिम वाटाघाटी मध्ये भाजप आणि शिवसेनेच्या काही जागा घटून त्या राष्ट्रवादीच्या वाटेला येण्याची शक्यता आहे.

दरम्यान या जागा वाटपाचा तिढा कायम असला तरी यामुळे भाजपच्या इच्छुकांसहित इतर पक्षाच्या इच्छुकांचे नाराजी नाट्य आगामी काळात पाहायला मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे महायुती किती जागांवर लढणार या घोषणाकडे आता संपूर्ण जळगाव वासियांचे लक्ष लागले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button