Other

उमाळा गावाजवळ भीषण अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

उमाळा गावाजवळ भीषण अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) –एका अज्ञात वाहनाने दुचाकी ला दिलेल्या जोरदार धाडते 40 वर्षीय शेतकऱ्याचा जागी मृत्यू झाल्याची घटना 11 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उमाळा गावाजवळ घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मृताचे नाव शरद समाधान पाटील (वय ४०, रा. उमाळे, ता. जळगाव) असे असून, ते आपल्या आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांसह उमाळा येथे राहत होते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता.

बुधवारी ते आपल्या शेतातील काम आटोपून सायंकाळी दुचाकीने घरी परतत असताना जळगाव-जामनेर रस्त्यावर अचानक एक अज्ञात वाहन वेगात आले व त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन पसार झाले.

अपघात इतका भीषण होता की शरद पाटील रस्त्यावर दूर फेकले गेले व गंभीर जखमी अवस्थेत कोसळले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत केली आणि त्यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

शरद पाटील यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई सुपडाबाई, वडील समाधान, पत्नी आशा, मुलगी केतकी आणि मुलगा मनोज असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष अचानक गमावल्याने घरच्यांची अवस्था विचित्र झाली आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button