Special

शहर पोलीस ठाण्यातील डीबी कर्मचाऱ्यांना लागली फुकट प्रसिद्धीची हाव!

महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | प्रत्येक पोलीस ठाण्यात काही कर्मचारी गुन्हे उघड करण्यास मेहनत घेतात. साहजिकच त्यात इतरांचे योगदान आणि सहकार्य असतेच मात्र सध्या शहर पोलीस ठाण्यात काही वेगळाच प्रकार घडत आहे. गुन्हे शोध घेताना मुख्य कर्मचाऱ्याला डावलत प्रसिद्धीसाठी इतरांची धडपड सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे.

जळगाव जिल्हा पोलीस दलात दररोज कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हे उघड होत आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि तपासाचा धागा गवसत गुन्हे उघड करीत आहेत. बऱ्याच पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचे खबऱ्यांचे नेटवर्क जोरदार असल्याने गुन्हे उघड करण्यात ते आघाडीवर असतात. जळगावात देखील असे काही कर्मचारी आहेत.

जळगाव शहर पोलीस ठाण्यात सध्या काही वेगळाच प्रकार सुरू आहे. गेल्या काही महिन्यात पोलीस ठाण्यातील डीबी पथकाकडून गुन्हे उघड केले जात असून त्यात तपासात मुख्य धागा गवसणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच डावलले जात आहे. अलीकडच्या ४-५ तपासात हा प्रकार निर्दर्शनास आला आहे. गुन्ह्याची उकल केल्यावर माध्यमांना माहिती देताना ती टाळणे किंवा माहिती दिल्यास ठराविक कर्मचाऱ्यांच्या नावाला प्राधान्य देण्याचे प्रकार सुरू आहे.

कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण..
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी हे एखादा गुन्हा शिताफीने उघड केल्यास कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देतात. अनेकदा तर त्यांनी तपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षीस देखील दिले आहे. जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी प्रोत्साहन देत असताना स्थानिक पोलीस ठाण्यात तपासी कर्मचाऱ्याला डावलले जात असल्याचा प्रकार नक्कीच निंदनीय आहे. एकच प्रकार वारंवार घडत असल्यास त्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत असते.

शहर पोलिसातील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता
शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या देखील हा प्रकार लक्षात आला आहे. त्यातच काही कर्मचारी डीबी पथकात प्रवेश मिळवण्यासाठी जुगाड लावत आहेत. पोलीस ठाण्यातील गटबाजी आणि चमचेगिरीमुळे हे प्रकार घडत असून त्याला आळा घालण्यासाठी थेट उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा अपर पोलीस अधीक्षकांना लक्ष घालण्याची गरज आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button