Crime

बैल बांधण्याच्या कारणावरून शेतकऱ्याला चौघांनी केली बेदम  मारहाण : मन्यारखेडा येथील घटना

बैल बांधण्याच्या कारणावरून शेतकऱ्याला चौघांनी केली बेदम  मारहाण : मन्यारखेडा येथील घटना

जळगावः तालुक्यातील मन्यारखेडा येथे बैल बांधण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला ४ जणांनी लोखंडी वस्तू डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली, तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दोन जणांना देखील मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ज्ञानेश्वर रमेश मराठे (वय-४२), रा. मन्यारखेडा शेतकरी असून त्यांना. रविवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता त्यांचा बैल बांधण्याच्या कारणावरून गावात

राहणारे निंबाजी पजई, सुरेश पजई, सुरेश भराडे आणि हिरामण भराडे या चौघांनी लोखंडी वस्तू डोक्यात टाकून मारहाण केली तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेले योगेश निंबाळकर आणि दिलीप निंबाळकर यांना देखील लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली.

दरम्यान याप्रकरणी ज्ञानेश्वर मराठे यांनी नशिराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी १० फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता संशयित आरोपी निंबा पजई, सुरेश पजई, सुरेश भराडे, हिरामण भराडे (सर्व रा. मन्यारखेडा) या चौघांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र तायडे करीत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button