
मुंबई वृत्तसंस्था ;-सध्या राज्यासह देशभरात ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वांमध्येच जल्लोषाचे वातावरण असून तळी रामासाठी एक खुशखबर आले असून पहाटे पाच वाजेपर्यंत दारूविक्री आणि बियर बार आणि पाब हे उघडे राहणार आहे. मात्र कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे.
गृह विभागाच्या आदेशानुसार, , 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर असे तीन दिवस दारूची दुकानाची वेळ वाढवण्यात आली आहे. दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर पब आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारी परवान्यानुसार दारूची दुकाने सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहतील. तर परमीट रूम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतील. रात्री साडेदहा वाजता राज्यभरात दारूची दुकाने बंद होतात. पण ख्रिसमस आणि वर्षाअखेरीस मद्यविक्रीची वेळ वाढवण्यात आल्याने तळी रामांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे .