Crime

बांभोरी पुलावरून उडी घेऊन युवकाची आत्महत्या

जळगाव I प्रतिनिधी एका २३ वर्षीय युवकाने १० रोजी बांभोरी येथील गिरणा नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुभम सतीश चौधरी (वय 23 रा. रेणुका नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली महिती आधी कि, यावल तालुक्यातील टाकरखेडा येथील रहिवासी असलेला शुभम चौधरी हा तरुण जळगाव शहरातील रेणुका नगरात मामाकडे राहावयास होता. आई-वडील हे सुरत येथे वास्तव्याला आहेत. शुक्रवारी १० जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शुभमने जळगाव शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली.हा प्रकार रिक्षा चालकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने जळगाव तालुका पोलिसांना कळविले. पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.

शुभमच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुभमच्या पश्चात आई वंदना, वडील, भाऊ गिरीश आणि लहान बहीण कोमल असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button