Social

“खचले आहात, सातत्याने अपयश येतंय, मेहनतीचे फळ मिळत नाही ? – खाटू श्याम बाबा

महापोलीस न्यूज l राकेश वाणी

ज्यांची प्रचिती संपूर्ण जगात “हारे का सहारा खाटू श्याम हमारा” या नावाने आहे, जो व्यक्ती आयुष्यात अपयश, संकट, रोग, चिंता अश्या अनेक संकटापासून घेरला गेलेला आहे, अश्या प्रत्येक भक्ताचे संकट क्षणात दूर करणारे भगवान श्रीकृष्णाचे अवतार “खाटू के बाबा श्याम” यांना अर्जी कशी लावावी.

राजस्थान मधील सीकर जिल्ह्यात खाटू मध्ये स्थित बाबा श्याम यांचे प्रकट स्थान खूप प्रसिद्ध आहे, बाबा श्याम यांना पूजणारा वर्ग संपूर्ण जगात खूप मोठा आहे, तसेच एकादशीला सुमारे 5 लाख ते 10 लाख भाविक खाटू श्याम दर्शनासाठी येतात.

पौराणिक कथेनुसार महाभारत काळात महाबली भीमपुत्र घाटोतकच व नागकन्या हिडीबा यांचे पुत्र बरबरीक यांनी भगवान श्रीकृष्णाला आपले शिश दान केले होते, तेव्हा श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन बरबरिकला वरदान दिला होता कि, कलियुगात तुला सर्व “श्याम” या नावाने ओळखतील व तुझ्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे संकट तू दूर करशील, ज्या माणसाच्या नशिबात कितीही संकट असूदेत फक्त तुझ्या दर्शनमात्रने त्याचे सर्व संकट दूर होतील.

अर्जी लावतांना एक नारळ, लाल कापड, आणि मौली सोबत आपल्याला असलेले संकट किव्हा आपली इच्छा असलेला मजकूर एका पर्चीवर लिहून आपल्या देवघरात ठेवायच आहे, व जेव्हा खाटू श्याम आपल्याला दर्शनासाठी बोलवतील तेव्हा ते अर्जीचे नारळ मंदिर परिसरात बांधायचे आहे. कित्येक भाविकांचे म्हणणे आहे कि हे केल्याने मात्र सव्वा महिन्याचा आत आपले संकट बाबा श्याम दूर करतात व आपल्या ईच्छा पूर्णतःवास येतात.

“चला तर मग तुम्ही केव्हा जात आहात खाटू श्याम”.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button