Social

प्रत्येक तालुका, कुमार साहित्याचे केंद्र व्हावे

आठव्या कुमार साहित्य संमेलनात  मान्यवरांचा  सूर

जळगाव :- विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे आयोजित आठव्या कुमार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने खानदेशाच्या विविध शाळांमधून आलेल्या बाल साहित्यिकांसह साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी कुमार साहित्याचा जागर होण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असा एकमताने निर्धार केला.

 

शहरातील मायादेवी नगर स्थित रोटरी भवन येथे आठव्या कुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई आणि विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले.

संमेलनाची दमदार सुरुवात डॉ.अविनाश आचार्य विद्यालय येथून ग्रंथ दिंडीने करण्यात आली. ग्रंथ दिंडीच्या उद्घाटन प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर एस .टी. इंगळे यांच्यासह प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, उपाध्यक्ष हेमलता अमळकर, सचिव विनोद पाटील, सहसचिव दिलीप महाजन, व्यवस्थापन परिषदेच्या डॉक्टर वैजयंती पाध्ये, शोभाताई पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीचा शुभारंभ झाला.

ढोल पथक, झांज पथक, लेझीम पथक ,टाळ पथक यासह पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले. संमेलनाचा उद्घाटन सोहळा रोटरी भवन येथे संपन्न झाला. व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या मुंबई येथील वयम मासिकाच्या संपादक शुभदा चौकर, राजेंद्र नन्नवरे, हेमलता अमळकर,डॉ महेंद्र शिरुडे, डॉ रत्नाकर गोरे,श्री अनिल राव , विनोद पाटील, संमेलना अध्यक्ष संस्कृती पवणीकर ,स्वागताध्यक्ष स्वरांगी कुलकर्णी ,कार्याध्यक्ष पियुष बालाजीवाले व्यासपीठावर उपस्थित होते
आजच्या आठव्या कुमार साहित्य संमेलनाच्या *परिसंवाद* सत्राला एकूण 24 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. डॉक्टर सुषमा खानापूरकर या सत्राला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. तसेच 73 विद्यार्थ्यांनी आपल्या *स्वरचित व संग्रहित कवितांचे* सादरीकरण केले. परीक्षक म्हणून सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूल मुक्ताईनगरचे मुख्याध्यापक जगदीश पाटील.यांनी कामकाज पाहिले.

अभिवाचन एकूण गट 22 यामधील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे श्री एकनाथ माळी लाभले *कथाकथन* या साहित्य प्रकारात एकूण 47 विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले प्रमुख पाहुणे श्री. विलास पाटील यांनी कामकाज पाहिले.

शुभदा चौकर- शिक्षण मुंबईत कांदिवलीत बालपण गेलं.वडील क्लर्क,तर आई हन्डिक्राप्ट टिचर होती.पहिली ते सातवी पर्यंत पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या शाळेमध्ये शिक्षण झाले.लहानपणापासून आईने ग्रंथालयात सोय करून दिली.म्हणून लहानपणापासून वाचनाची आवड लागली .आजी कविता करायची तिच्यामुळे लिहण्याची प्रेरणा मिळाली.लहानपणी खूप प्रश्न विचारायची.त्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं ऐकायला आवडायचं.कोणत्याही गोष्टीचं कुतुहल खूप होते.का,कसे, कुठून असे प्रश्न मला पडायचे आणि तिथूनच पत्रकारिते यावं हे मी ८वी९वीत असताना च ठरवले.तिथूनच मी लिहायला लागले.पुढे पदवीच्या शिक्षण घेत असताना पत्रकारितेत आले. सर्वच लेखक आवडतात.पुलंच्या विनोदी पुस्तकांपेक्षा व्यक्तिचित्रण आवडतात.
त्या संपादक तर आहेच त्याचबरोबर समाजसेवा हा त्यांचा आवडीचा पिंड आहे.त्या कॉलेजच्या महाविद्यालयीन काळामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या होत्या . लोकसत्ता मध्ये पत्रकार असताना वीस वर्षात त्यांना समाजकार्य करायला वेळ नाही मिळाला कारण एखाद्या वृत्तपत्रामध्ये जबाबदारीच्या पदावर असता तेव्हा आपण एखाद्या संस्था संघटनेचे तुम्ही काम करताय हे काही वेळा इतरांवर अन्यायकारक ठरु शकते पत्रकारितेच्या लोकसत्ताच्या वीस वर्षांमध्ये सामाजिक काम वेळेअभावी करता आले नाही 2012 मध्ये लोकसत्तातून निवृत्ती घेतल्यानंतर एकीकडे वयम मासिक सुरू केलं त्याच्या संपादक झाल्या श्रीकांत बापट लॅब इंडिया म्हणून एक मोठी कंपनी आहे त्यांचं हे प्रोजेक्ट होतं त्यामुळे त्यांच्या पाठबळावर त्यांच्या पैशावर त्यांच्याच जागेमध्ये आपण वयंमचे ऑफिस थाटले आणि वयंम मासिक तिथूनच निर्माण झालं .यात मोठी टीम आहे माझा एकटीच यश नाहीये हे त्यांनी सांगितले. वयंम मासिकाची लेखकाची जवळजवळ 50-60 जणांची टीम आहे. त्यात वेगवेगळ्या विषयातले लेखक आहेत. जे विज्ञान तंत्रज्ञान पासून ते गोष्टी कविता पर्यंत वेगवेगळे लिहितात.सदर मुलाखत दिव्येंदू झारे , रमा पुंडे या विद्यार्थ्यांनी घेतली मुलाखत समारोप प्रसंगी केशवस्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा श्री भरत दादा अमळकर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक प्रमुख श्री किरण सोहळे यांचे मार्गदर्शन लाभले. आयोजन समिती सदस्य सौ वैशाली पाटील,अनघा सागडे ,श्री सचिन गायकवाड, भारती माळी, तेजश्री बाविस्कर, अनुराधा धायबर, दीपिका चौधरी,प्रवीण पाटील,प्रमोद इसे यांचे सहकार्य लाभले.कार्यकामाचे आभार प्रदर्शन डॉ निलश्री सहजे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button