नगरपंचायत निवडणूक : जळगाव जिल्ह्यात मतदानाला संमिश्र प्रतिसाद

नगरपंचायत निवडणूक : जळगाव जिल्ह्यात मतदानाला संमिश्र प्रतिसाद
दुपारी दीड वाजेपर्यंत ४.२६ टक्के मतदान
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीसाठी शनिवारी दि. २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रिया सुरू असून सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासांत मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील वरणगाव, पाचोरा, भुसावळ, अमळनेर, सावदा आणि यावल या सहा नगरपंचायतींसाठी एकूण ३३ हजार ६६२ मतदार नोंदणीकृत असून त्यापैकी सकाळच्या सत्रात १ हजार ४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे एकूण सरासरी मतदानाची टक्केवारी ४.२६ इतकी नोंदविण्यात आली आहे.
वरणगाव नगरपंचायतीत ४ हजार ९७९ मतदारांपैकी २९७ मतदारांनी मतदान केले असून येथे ५.९७ टक्के मतदान झाले. पाचोरा नगरपंचायतीत एकूण ८ हजार ८४० मतदारांपैकी २७० मतदारांनी मतदान करत ३.०५ टक्के मतदानाची नोंद झाली. भुसावळ येथे ८ हजार ३८० मतदारांपैकी २८९ मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी ३.४५ इतकी आहे.
अमळनेर नगरपंचायतीत एकूण ५ हजार ८८० मतदारांपैकी २५८ मतदारांनी मतदान करत ४.३९ टक्के मतदान झाले. सावदा नगरपंचायतीत सकाळच्या सत्रात ७७ मतदारांनी मतदान केले असून येथे मतदानाची टक्केवारी ८ इतकी सर्वाधिक नोंदविण्यात आली. यावल नगरपंचायतीत ३ हजार ४३४ मतदारांपैकी २४४ मतदारांनी मतदान केले असून येथे ७.११ टक्के मतदान झाले आहे.
सकाळच्या वेळेत थंडीचा कडाका असतानाही काही ठिकाणी मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, तर काही नगरपंचायतींमध्ये दुपारनंतर मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक व्यवस्था केल्याची माहिती दिली आहे.






