Social

Train Accident : पाचोरा रेल्वे अपघातामुळे २४ वर्षापूर्वीच्या बोदवड रेल्वे अपघाताची कटू आठवण!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील परधाडे येथे आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या. परंतु समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने चिरडल्याने १३ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. कालच्या घटनेने २४ वर्षापूर्वी बोदवड येथे झालेल्या अपघाताची कटू आठवण ताजी झाली आहे. बोदवड भीषण रेल्वे अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला होता.

पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशनजवळ बुधवार दि.२२ जानेवारी २०२४ रोजी पुष्पक एक्सप्रेस पाचोऱ्याच्या दिशेने येत असताना ४.४५ वाजेच्या सुमारास रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरली. आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या मारल्या. परंतु समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवले. या घटनेत १३ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १५ प्रवासी जखमी झाले आहेत.

प्रवाशांनी ओढली साखळी आणि घडलं विपरीत
जळगाव जिल्ह्यासह देशासाठी दुर्दैवी ठरणारा असाच एक रेल्वे अपघात दि.१६ ऑगस्ट २००१ रोजी घडला होता. १३९७ डाऊन भुसावळ-वर्धा पॅसेंजर गाडीतील काही प्रवाशांनी अचानक चेन ओढल्यामुळे गाडी थांबली. यानंतर काही प्रवासी पटरी ओलांडत असताना गीतांजली एक्सप्रेसने त्यांना धडक दिली. अपघातात १५ प्रवाशांना जीव गमवावा लागला होता.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button