मेहरूण तलावात पोहायला गेले, चोरट्याने ७ मोबाईल लांबवले
एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला केली अटक, मोबाईल हस्तगत

महा पोलीस न्यूज | १७ मे २०२४ | शहरातील खेडी परिसरात राहणारे काही तरुण पोहण्यासाठी मेहरूण तलाव येथे गेले होते. मोबाईल दुचाकीच्या डिक्कीत ठेवून ते पोहण्यासाठी गेले आणि तासाभराने बाहेर आले असता त्यांचे मोबाईल चोरी झाले होते. एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला अटक केली असून ७ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
खेडी येथील रहिवासी असलेले नवीतेजा अशोक मिंडे हे दि.१२ मे रोजी त्यांच्या ६ मित्रांसह मेहरुण तलाव येथे पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी पोहण्यापुर्वी आपले ७ मोबाईल फोन हे मोटारसायकलचे डिक्कीत ठेवून पोहण्यासाठी गेले. साधारण १ तास पोहून झाल्याववर ते दुचाकीजवळ आले व आपआपले मोबाईल गाडीचे डिक्कीतुन काढणेसाठी गेले असता त्यांना मोबाईल मिळुन आले नव्हते.
याप्रकरणी फिर्यादी नवीतेजा अशोक मिंडे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन ८१ हजार रुपये किंमतीचे एकूण ७ मोबाईल फोन चोरी गेल्याबाबत फिर्याद दिल्यावरुन भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांना गोपनीय बातमी मिळाली होती की, या परीसरात काम करणाऱ्या एका वॉचमनने मोबाईल चोरी केले आहे अशी बातमी मिळाली होती. याबाबतीत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहीती दिली असता त्यांनी गुन्हे शोधपथकाचे अंमलदार यांना माहीती काढुन गुन्हा उघडकिस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.
पोका गणेश ठाकरे याने स्वतःचे कौशल्य वापरुन सोबत टिम घेवुन अनिल रघुनाथ चव्हाण वय ३४ वर्ष रा रोटवड तांडा ता.जामनेर जि.जळगाव यास ताब्यात घेवुन त्याची विचारपुस करता त्यानेच ७ मोबाईल फोन हे चोरी केल्याची कबुली दिली. त्यास दि.१६ रोजी अटक करुन त्याचेकडुन ७ मोबाईल फोन हे हस्तगत केले आहे.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी, भाग जळगाव संदिप गावित यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, पोहेका सचीन मुंढे, पोना किशोर पाटील, योगेश बारी, ललीत नारखेडे, चंद्रकांत पाटील यांनी पार पाडली आहे.