जैन इरिगेशन आणि आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने मसाला समूह कार्यशाळा

.
जैन इरिगेशन आणि आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने मसाला समूह कार्यशाळा
पेसा क्षेत्रातील आदिवासी वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी नव्या संधींचे दार उघडणार
जळगाव, प्रतिनिधी
पेसा क्षेत्रातील वैयक्तिक वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या 100 दिवसांच्या कामाच्या आराखड्यानुसार जैन इरिगेशन आणि आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने मसाला समूह कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
ही दोन दिवसीय कार्यशाळा 19 आणि 20 मार्च 2025 रोजी जैन हिल्स येथे पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना मसाला उत्पादन, प्रक्रिया आणि विक्रीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्याची संधी
या उपक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी शेतकऱ्यांना मसाला उत्पादनाच्या माध्यमातून अधिकाधिक उत्पन्न मिळवून देणे, त्यांच्या उत्पादनांचे मूल्यवर्धन करणे आणि त्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे. कार्यशाळेत मिरची, हळद, टोमॅटो, आले, लसूण यांसारख्या मसाला पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.
ही कार्यशाळा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. अध्यक्ष अशोक जैन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल उपवनसंरक्षक . जमीर शेख एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी . कुर्बान तडवी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त . प्रदीप झोड सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अतुल पाटील लोक संघर्ष समन्वय मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या योजना आणि तंत्रज्ञानाचा वापर – आदिवासी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन
कार्यशाळेत जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत आदिवासी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती उत्पादन वाढवावे असे आवाहन केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत शेतीमधील उत्पादन वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांनी सांगितले की, पेसा ग्रामपंचायतीसाठी आवश्यक असलेली सर्व विकासकामे पूर्ण केली जातील आणि शिक्षण, आरोग्य यांसारख्या क्षेत्रांतही विशेष लक्ष दिले जाईल.
जैन इरिगेशनच्या तांत्रिक सहकार्याने शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण
जैन इरिगेशनचे संचालक श्री. अशोककुमार जैन यांनी सांगितले की,
“या मसाला समूह उपक्रमासाठी आम्ही शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि विपणन प्रशिक्षण देणार आहोत. यामुळे शेतकऱ्यांना जागतिक दर्जाची उत्पादने निर्माण करता येतील आणि त्यांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध होईल.”
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या कार्यशाळेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी मसाला समूहाच्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. शासनाच्या आणि जैन इरिगेशनच्या सहकार्याने त्यांना मिळणाऱ्या नव्या संधींबद्दल समाधान व्यक्त केले.
भविष्यातील नियोजन आणि धोरणात्मक बाबी
2025 पर्यंत मसाला समूहाची स्थापना करण्यात येणार असून, जैन इरिगेशनच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येईल. हा समूह शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देईल तसेच त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत करेल.
शासनाच्या योजनांचा लाभ आणि धोरणे
वनहक्क धारकांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या योजनांचा लाभ मिळणार आहे.
तालुका व जिल्हा स्तरावर समन्वय समित्या स्थापन करून योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल.
वनहक्क धारक शेतकऱ्यांसाठी क्लस्टर पद्धतीने मसाला समूह विकसित करण्यात येणार आहेत.
आदिवासी विकास विभाग, वन विभाग आणि कृषी विभाग समन्वयाने कार्य करणार आहेत.
आधुनिक शेती आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्र
शेतकऱ्यांना फळबाग लागवड, कांदा, लसूण, हळद यांसारख्या शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले. वाफसा किती खोल, रुंद करावा, पाणी व्यवस्थापन कसे करावे याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, उपजिल्हाधिकारी (मनरेगा) श्रीमती अर्चना मोरे, जिल्हा कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा माहिती अधिकारी . युवराज पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श संदीप पाटील आदी उपस्थित होते.