Crime

डोमगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

डोमगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव (प्रतिनिधी): डोमगाव (ता. जळगाव) येथील ३८ वर्षीय शेतकरी किशोर आसाराम धनगर याने कर्जाच्या तणावाखाली आणि दुबार पेरणीच्या संकटामुळे सोमवारी (७ जुलै) दुपारी २:३० वाजता म्हसावद रेल्वे गेटजवळ पुष्पक एक्सप्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केली

.किशोर यांच्या पश्चात आई, पत्नी, सात वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी आहे. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस नाईक हेमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button