अहिराणी भाषा संस्कृती टिकून ठेवण्यात महिलांचे योगदान महत्वपूर्ण

अहिराणी भाषा संस्कृती टिकून ठेवण्यात महिलांचे योगदान महत्वपूर्ण
जागतिक महिला दिनानिमित्त कवयित्री मनीषा पाटील यांचे प्रतिपादन
भडगाव प्रतिनिधी
अहिराणी बोली भाषा साहित्य व संस्कृती मधील संस्कार फार मोलाचे आहेत .अहिराणी भाषा संस्कृती टिकून ठेवण्यात महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे .महिलांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षणासह संस्कारित करुन देशात नावलौकिक होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन खान्देशातील अहिराणी कवयित्री शिक्षिका सौ .मनीषा टिकाराम पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांबरुड बु ॥ येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात केले .
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले .
याप्रसंगी महिलांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे याविषयी मनोगत व्यक्त करताना प्रमुख अतिथी खान्देशातील अहिराणी कवयित्री शिक्षिका सौ . मनीषा टिकाराम पाटील यांनी अहिराणी भाषेचे महत्व समजावून सांगताना अहिराणी बोलीभाषेतील लेक वाचवा लेक शिकवा, हुंडा पद्धतीला विरोध करणाऱ्या आणि शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या अहिराणी कविता सादर केल्या . कार्यक्रमाला ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी आर .बी . पाटील ,मुख्याध्यापक एकनाथ गोफणे ,दिनकर महाजन ,साहेबराव कोळी ,ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पाटील , Smc सदस्य भरत महाजन अंगणवाडी सेविका उषा पाटील ,इंदिरा गोसावी , वंदना पाटील , आशा स्वयंसेविका मालुताई पाटील ,मनीषा पाटील
महिला बचत गटाच्या सदस्या व माता पालक उपस्थित होत्या .यावेळी प्रास्ताविकात उपशिक्षक मनोज पाटील यांनी निपुण भारत अभियान निपुण माता गटांची कार्य याविषयी माहिती दिली . इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कृतिका महाजन यांनी महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले . प्रियंका जाधव यांनी आभार मानले .