Crime

अमळनेरच्या बाजारपेठेत दिवसाढवळ्या चोरी ; तीन लाखांची रोकड लंपास

अमळनेरच्या बाजारपेठेत दिवसाढवळ्या चोरी ;  तीन लाखांची रोकड लंपास

अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत मंगळवारी (दि. १० जून) दुपारी दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका शेतकऱ्याच्या दुचाकीवरून तीन लाख रुपये रोख असलेली पिशवी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी भानुदास पाटील (वय ५९, रा. वासरे, ता. अमळनेर) हे शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मंगळवारी दुपारी ते अमळनेर शहरात खरेदीसाठी आले होते. बाजारपेठेतील विजय शॉपीसमोरील हातगाडीवर आंबे खरेदी करत असताना, त्यांनी आपली तीन लाख रुपये रोख असलेली पिशवी दुचाकीच्या हँडलला टांगली होती.

याचवेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ही पिशवी लंपास केली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने परिसरात शोध घेतला, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. रात्री उशिरा त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button