Crime

मयत व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला उत्तराधिकारी प्रमाणपत्र विना वारस प्रमाणपत्राद्वारे तक्रार करण्याचा अधिकार – उच्च न्यायालय

जळगाव ( प्रतिनिधी) :-मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मयत व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला उत्तराधिकारी प्रमाणपत्राच्या शिवाय वारसा प्रमाणपत्र कलम 1881 च्या कलम 138 अंतर्गत तक्रार दाखल करण्याचा अधिकार प्रदान करण्याचा निर्णय दिला आहे.

याबाबत माहिती अशी की अभिजीत पाथरीकर यांनी त्यांच्या मयत वडील जयराज पाथरीकर यांच्या वतीने चेक बाउन्स झाल्याच्या प्रकरणात जुडीशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास औरंगाबाद यांच्या कोर्टात कलम 1881 च्या कलम 138 अंतर्गत तक्रार दाखल केली होती. याबाबत प्रतिवादी ला न्यायालयाने नोटीस जारी केली होती. या नोटीसीच्या आदेशाविरुद्ध प्रतिवादीने ॲडिशनल सत्र न्यायाधीश औरंगाबाद यांच्या न्यायालयात रिविजन पिटीशन दाखल करून आव्हान दिले. या पिटीशन वर ॲडिशनल सत्र न्यायाधीशांनी वादीला उत्तराधिकारी प्रमाणपत्राच्या अभावात तक्रार दाखल करणे अशक्य असल्याचे निर्देश दिले. या निर्णयाच्या विरोधात वादी अभिजीत पाथरीकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागितला होता. यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ऐतिहासिक निर्णयाद्वारे मयत व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला उत्तराधिकारी प्रमाणपत्र विना वारसा प्रमाणपत्राच्या आधारे कलम 1881 च्या च्या कलम 138 अंतर्गत तक्रार दाखल करण्याचा अधिकार प्रदान केला आहे. या प्रकरणात वादीच्या वतीने एडवोकेट रंजीता रघुवीर बारहाते यांनी काम पाहिले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button