Politics

भाजपने केली 40 बंडखोरांची हकालपट्टी

मुंबई -भाजपने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील 40 पदाधिकारी नेत्यांची हकालपट्टी केल्याची पत्रक जाहीर केले आहे. यामध्ये जळगाव शहरातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले डॉक्टर अश्विन सोनवणे आणि मयूर कापसे यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान पाचोरा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे अमोल शिंदे आणि चाळीसगाव मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविणारे माजी खासदार एटी नाना पाटील यांची पक्षाने हकालपट्टी केलेली नाही.

महाराष्ट्र भाजपाच्या लेटर हेटवर जारी करण्यात आलेल्या या पत्रावर भाजपाच्या नरिमन पॉइंट कार्यालयाचा पत्ता आहे. “आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असूनही पक्षशिस्त व अनुशासन भंग करण्याचं कृत्य केलं आहे. आपली ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असल्याने आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे,” असं भाजपाने या पत्रात म्हटलं आहे. या पत्रकाखाली कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णींची स्वाक्षरी आहे. 37 मतदारसंघांमधील पदाधिकारी आणि नेत्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

भाजपाने हकालपट्टी केलेल्या 40 नेते/पदाधिकाऱ्यांची नावं खालीलप्रमाणे :

धुळे ग्रामीण – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील

जळगाव शहर – मयुर कापसे, आश्विन सोनावणे

अकोट – गजानन महाले

वाशिम – नागेश घोपे

बडनेरा – तुषार भारतीय

अमरावती – जगदीश गुप्ता

अचलपूर – प्रमोद सिंह गडरेल

साकोली – सोमदत्त करंजेकर

आमगाव – शंकर मडावी

चंद्रपूर – ब्रिजभूषण पाझारे

ब्रम्हपूरी – वसंत वरजुरकर

वरोरा – राजू गायकवाड, अतेशाम अली

उमरखेड – भाविक भगत, नटवरलाल उंतवल

नांदेड उत्तर – वैशाली मिलिंद देशमुख, मिलिंद उतमराव देशमुख

नांदेड दक्षिण – दिलीप वेंकटराव कंदकुर्ते, सुनील साहेबराव मोरे, संजय घोगरे

घणसावंगी – सतीश जगनाथराव घाटगे

जालना – अशोक पांगरकर

गांगापूर – सुरेश सोनावणे

वैजापारू- एकनाथ जाधव

मालेगाव बाह्य – कुणाल शिवाजी सुर्यवंशी

बागलान – आकाश साळुंखे, जयश्री गरुड

नालासोपारा – हरिष भगत

भिवंडी ग्राणी – स्नेहा देवेंद्र पाटील

कल्याण – वरुण सदाशिव पाटील

मागाठणे – गोपाळ जव्हेरी

जोगेश्वरी पूर्वी – धर्मेंद्र गोपीनाथ ठाकूर

अलिबाग – दिलीप विठ्ठल भोईर

नेवासा – बाळासाहे मुरकुटे

सोलापूर शहर उत्तर – शोभा बनशेट्टी

अक्कलकोट – सुनिल बंडगर

श्रीगोंदा – सुवर्ण पाचपुते

सावंतवाडी – विशाल प्रभाकर परब

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button