Education

१०वीचा निकाल जाहीर : मुलींनीच मारली बाजी ! 

यंदा ९४.१०% टक्के उत्तीर्ण; 'लातूर पॅटर्न' पुन्हा एकदा यशस्वी

महापोलीस न्यूज l१३ मे २०२५

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा (SSC) निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याचा एकूण उत्तीर्णतेचा टक्का ९४.१०% इतका नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात १.७१ टक्क्यांची घट झाली आहे.

मुलींची बाजी कायम
यंदाही मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
• मुलींचा निकाल – ९६.१४%
• मुलांचा निकाल – ९२.३१%

फक्त ३५% गुण मिळवून २८५ विद्यार्थी काठावर पास
राज्यातील एकूण २८५ विद्यार्थी अवघ्या ३५ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले. जिल्हानिहाय आकडेवारी:
• मुंबई – ६७
• नागपूर – ६३
• पुणे – ५९
• संभाजीनगर – २६
• अमरावती – २८
• कोल्हापूर – १३
• लातूर – १८
• नाशिक – ९
• कोकण – ०

१००% गुण मिळवणारे २११ विद्यार्थी – लातूर आघाडीवर
राज्यात २११ विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून शंभर टक्के निकालाची कामगिरी केली. लातूर विभागातील ११३ विद्यार्थ्यांनी हे यश मिळवत पुन्हा एकदा ‘लातूर पॅटर्न’ सिद्ध केला आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी:
• लातूर – ११३
• संभाजीनगर – ४०
• पुणे – १३
• कोल्हापूर – १२
• अमरावती – ११
• कोकण – ९
• मुंबई – ८
• नागपूर – ३
• नाशिक – २

सर्वाधिक आणि सर्वात कमी निकालाचे जिल्हे
• सर्वाधिक निकाल: सिंधुदुर्ग – ९९.३२%
• सर्वात कमी निकाल: गडचिरोली – ८२.६७%

१५.५८ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, १४.५५ लाख उत्तीर्ण
राज्यभरातून एकूण १५.५८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५.४६ लाख विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले आणि त्यामधील १४.५५ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button