PoliticsSocial

आंतरजिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रमाच्या समारोप समारंभास खा. स्मिताताई वाघ यांनी तरुणांना केले मार्गदर्शन

आंतरजिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रमाच्या समारोप समारंभास खा. स्मिताताई वाघ यांनी तरुणांना केले मार्गदर्शन
जळगाव मेरा युवा भारत – नेहरू युवा केंद्र जळगाव द्वारे १३-१७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आंतरजिल्हा युवा
आदान प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुंबईतील २७ तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. १५ फेब्रुवारी रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत प्रकल्प अधिकाऱ्यांनी लालमती आश्रम शाळा आणि गावाला भेट दिली आणि तेथील लोकांचे जीवन समजून घेतले. त्यानंतर मनोलव प्रकल्प, दीपस्तंभ संस्थेतील अपंग विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेण्यात आली जेथे युजवेंद्र महाजन यांच्या दृढ निश्चय आणि समर्पणाने तरुणांना समाजसेवेची प्रेरणा दिली. १६ फेब्रुवारी रोजी अजिंठा लेण्यांना भेट देऊन भारताच्या सांस्कृतिक वारशाबद्दल माहिती दिली

.
कार्यक्रमाचा समारोप समारंभ १७ फेब्रुवारी रोजी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. प्रास्ताविकात, नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र यांनी ०५ दिवसांच्या उपक्रमांची माहिती दिली. विभागीय नियंत्रक, एमएसआरटीसी भगवान जगनोर यांनी तरुणांना जळगावमधील वाहतूक परिस्थिती आणि भविष्यातील नियोजित विकास कामांबद्दल माहिती दिली आणि तरुणांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. जळगाव येथील प्राचार्य सोना कुमार यांनी तरुणांना नवीन शिक्षण प्रणाली आणि करिअरबद्दल मार्गदर्शन केले.

खासदार श्रीमती स्मिताताई वाघ तरुणांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी तरुणांना देश आणि समाजाच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा दिली. जळगावमध्ये होत असलेल्या आर्थिक विकासाविषयी, जसे की एमआयडीसी, विमानतळ इत्यादींचे अपग्रेडेशन, याबद्दलही तरुणांना माहिती देण्यात आली. दुर्गम आदिवासी गावांच्या विद्युतीकरणासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निधीचीही तरुणांना माहिती करून देण्यात आली. त्यांनी भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया इत्यादी युवा विकास योजनांचे कौतुक केले. व्यावसायिकतेवर भर देत, तरुणांना कौशल्य विकासासाठी प्रेरित केले. व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये चांगले समन्वय साधण्यासाठी त्यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. तरुणांना सन्मानचिन्हे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तरुणांनी देखील त्यांचे ५ दिवसांचे अनुभव सांगितले. अजिंक्य गवळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तुषार साळवे, तेजस पाटील, अनिल बाविस्कर, मुकेश भालेराव आणि रोहन अवचरे यांनी प्रयत्न केले

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button