Crime

जखमींना ३८ दिवसांत मिळाली अपघाताची नुकसान भरपाई

जखमींना ३८ दिवसांत मिळाली अपघाताची नुकसान भरपाई

जळगाव : मोटार अपघातातील जखमींना अवघ्या ३८ दिवसांत नुकसानभरपाई मिळवून देण्यात यश मिळाले आहे. येथील न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणात महेश मधुकर पाटील, सुमित सुधाकर पाटील आणि अक्षदा संतोष जंगले यांनी संबंधित विमा कंपनीविरुद्ध दावा दाखल केला होता. हे तिन्ही दावे अॅड. दिपक के. समदाणी, अॅड. अक्षय डी. समदाणी आणि कार्तिक डी. समदाणी यांनी १० तारखेला विमा कंपनीविरुद्ध दाखल केले. यावेळी वकिलांनी विमा कंपनीशी तडजोडीसाठी चर्चा करून राष्ट्रीय लोक न्यायालयात सुमारे एका महिन्याच्या कालावधीत तडजोड केली. त्यामुळे जखमींना ३८ दिवसांत मोटार अपघात विम्याची नुकसानभरपाई मिळाली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button