‘त्या’ हाणामारी प्रकरणातील ७ फरार संशयिताना शहर पोलिसांनी पकडले

महा पोलीस न्यूज । दि.४ जानेवारी २०२४ । जून्या वादातून दोन गटात हाणामारी होवून दगडफेक झाल्याची घटना घडली होती. यावेळी एका तरुणाचा मृत्यू झाला होता तर दुसऱ्या गटातील काही जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित फरार झाले होते. फरार झालेल्या सात जणांना शहर पोलिसांनी राजमालती नगरातून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जून्या वादातून राजमालती नगरात दोन गटातील वाद पुन्हा उफळून दगडफेकीसह हाणामारीची घटना दि.२० नोव्हेंबर रोजी राजमालती नगरात घडली होती. यामध्ये एका गटातील सिद्धार्थ माणिक वानखेडे यांचा मृत्यू झाला होता तर दोन्ही गटातील सहा जण जखमी झाले होते. दरम्यान, दुसऱ्या गटातील जखमी राजू पटेल शहर पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार मारहाण करणाऱ्या १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित हे फरार झाले होते.
सर्व संशयित राजमालती नगरात आल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी धाव घेत सर्वांना ताब्यात घेतले. राजकुमार अजय सुरवाडे (वय २७), प्रेम उर्फ छोटू विजय सुरवाडे (वय ३८), भूषण उर्फ मटका पंडीत रांजण (वय २१), मंगेश सुभाष काजवे (वय २८), दिनेश दीपक माने (वय ३४), रविंद्र उर्फ रवी सुर्यभान जंजाळे (वय ३८) व गौतम उर्फ पिंट्या लक्ष्मण बिऱ्हाडे (वय ३९, सर्व रा. राजमालती नगर) अशी त्यांची नावे आहेत.
सर्वांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता घटनास्थळी लाकडी दांडा, बल्ली, लोखंडी सळई व चाकू सारखे धारदार शस्त्रे होती. त्यामुळे त्यामुळे हा नियोजीत कट असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करायचे असल्याने न्यायालयाने संशयितांना दि.७ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड, किशोर निकुंभ, संतोश खवले, योगेश पाटील, दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने केली आहे.