Other

भुसावळ रेल्वे मंडळाकडे प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन : अनधिकृत तिकीट दलालांवर कारवाईची मागणी

भुसावळ रेल्वे मंडळाकडे प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन : अनधिकृत तिकीट दलालांवर कारवाईची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे मंडळातर्फे प्रवाशांसाठी सुविधा वाढविण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन रेल्वे अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य विराज कावडीया व मुजीब पटेल यांनी वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांची भेट घेऊन जळगाव रेल्वे स्थानकासह प्रवाशांच्या विविध समस्या चर्चेत आणल्या.

यावेळी मंडल सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशीही उपस्थित होते. निवेदनात जळगाव रेल्वे स्थानकावर तत्काळ तिकीट आरक्षणासाठी सकाळी १० ते ११ या वेळेत अनधिकृत तिकीट दलालांकडून होत असलेल्या त्रासांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यासंदर्भात आरपीएफ पोलिस निरीक्षकांना निर्देश देण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

तसेच गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली बॅटरी कार सेवा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. ही सेवा सुरू झाल्यास ज्येष्ठ नागरिक व अपंग प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

याशिवाय रेल्वे स्थानक परिसरातील वेंडर्सकडून ‘रेल नीर’ पाण्याच्या बाटल्यांचे दर शासकीय दरापेक्षा अधिक आकारले जात असल्याच्या तक्रारीवरही नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने यावर त्वरित कारवाईचे आश्वासन दिले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील अनधिकृत अतिक्रमणामुळे प्रवाशांना व वाहनचालकांना होणारा त्रास, तसेच सुरक्षिततेचा मुद्दा उचलून धरत या अतिक्रमणावर तातडीने कारवाई व्हावी, यासाठी मनपा व पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडून मांडण्यात आला.

या बैठकीस यश लोढा व आयुष कस्तुरे यांचीही उपस्थिती होती.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button