शिवी दिल्याने चिरला पादचाऱ्याचा गळा, दोन तासात एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या

महा पोलीस न्यूज | ३ जून २०२४ | जळगाव शहरातील नाथवाडा ते सिंधी कॉलनी रस्त्यावर एका ४८ वर्षीय इसमाची गळा चिरून हत्त्या करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोन तासात संशयितांचा शोध घेत तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. रस्त्यावरून चालताना शिवी दिल्याने झालेल्या वादातून खून केल्याची माहिती आरोपींनी दिली आहे.
सोमवार दि.३ जून रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नाथवाडा परिसरात डॉ.अर्जुन भंगाळे यांचे दवाखान्याच्या बांधकामासाठी रोडवर टाकलेल्या वाळुच्या ठिकाणी एक ईसम मयत स्थितीत पडून होता. एमआयडीसी पोलीसांनी जाउन खात्री केली असता त्या ईसमांचा कोणीतरी खुन केला असल्याने त्यांची ओळख पटवण्यात आली होती. मयत ललीत प्रल्हाद वाणी, वय ४८ वर्षे, रा.प्लॉट नंबर १२, मरीमाता मंदीरा जवळ, नाथवाडा, जळगाव असा असल्याची ओळख पटवुन माहीती घेतली असता तो सुप्रीम कंपनी, गाडेगाव येथे नोकरीस असल्याची माहीती मिळाली होती.
दि.२ जून रोजी ललीत वाणी हे कंपनीमध्ये सेकंड शिफ्टला कामावर गेले होते व रात्री उशीरा पावेतो घरी आले नसल्याबाबतची माहीती मिळाली होती. ओळख पटल्यावर त्यांचा खुन झाल्याने त्यांची पत्नी मेघा ललीत वाणी यांना माहीती देण्यात आली होती. पतीचा मृतदेह पाहताच कुटुंबियांनी आक्रोश केला होता. गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी भेट दिली होती व गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
गुन्हयाचा तपास सुरु असतांना पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहीती मिळाली कंजरवाडा भागात काही मुलांनी मयत इसमाशी वाद केला होता. पोलिसांनी कंजरवाडा परीसरातील माहीती काढुन कमल किरण बागडे यास ताब्यात घेवुन त्याची चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्हा करतेवेळी त्याचे सोबत अजुन दोन साथीदार असल्याची माहीती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तुकारामवाडी परीसरातुन हेमंत केशव सपकाळे व जानकीनगर येथुन युवराज कैलास पाटील यांना ताब्यात घेतले होते. त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल करुन चाकुने मारल्याची हकीकत सांगीतली होती. मयताचा व त्यांचा रस्त्यावरुन जात असतांना शिवी देण्यावरून तत्कालीन वाद झाल्यामुळे त्यांनी खुन केल्याचे सांगीतले होते.
तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
याप्रकरणी मयताची पत्नी मेघा ललीत वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कमल किरण बागडे, वय १९ वर्ष, रा.जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव, हेमंत केशव सपकाळे, वय १९ वर्ष, रा. तुकारामवाडी, जळगाव, युवराज कैलास पाटील, वय २० वर्ष, रा. जानकी नगर, जळगाव यांचे विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना ही मध्यरात्री घडलेली असुन सुध्दा गोपनीय माहीतीच्या आधारे पथकाने गुन्हा उघडकीस आणला आहे. माहीती मिळाल्यानंतर दोन तासाच्या आत अज्ञात आरोपी निष्पन्न करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, स.पो.नि.दयानंद सरवदे, स.पो.निरी. आसाराम मनोरे, पो.उप. निरी. दत्तात्रय पोटे, स.फौ. अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, राजेंद्र कांडेलकर, सचिन मुंढे, रतीलाल पवार, सचिन पाटील, छगन तायडे, विनोद ऑस्कर, सिध्देश्वर डापकर, राहुल रगडे, विशाल कोळी, साईनाथ मुंढे, निलेश पाटील अशांनी केली आहे.