Maharashtra

गिरणा प्रकल्पातून विसर्गात वाढ ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गिरणा प्रकल्पातून विसर्गात वाढ ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव प्रतिनिधीI प्रकल्पामध्ये वाढत्या पाणलोट क्षेत्रातील आवक पाहता आज दि. १४ रोजी सायकाळी ७ वाजता प्रकल्पाचा विसर्ग ८१४ क्युसेक्स वरून वाढवून २४७६ क्युसेक्स (७०.७क्युमेक्स) करण्यात आला आहे. चाळीसगाव पाटबंधारे विभागाने नागरिक, शेतकरी व नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या प्रकल्पाचे वक्रद्वार क्र. १ व ६ हे प्रत्येकी ३० सेंमीने उघडे असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. पुढील काळात प्रकल्पातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गात वाढ अथवा घट करण्यात येईल. दरम्यान – जिल्ह्यातील वाघूर धरणही ९५.५३ टक्के भरले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button