जळगावात दणक्यात होणार उद्भव ठाकरेंचा वाढदिवस, कुलभूषण पाटील राबवणार उपक्रम
मातोश्रीवर घेतली उध्दव ठाकरेंची भेट : १० हजार छत्री व टीशर्ट वाटणार

महा पोलीस न्यूज । २४ जुलै २०२४ । शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस लवकरच येत आहे. उबाठा गटाचे उपमहापौर कुलभुषण पाटील हे उद्भव ठाकरे यांचा वाढदिवस जळगावात दणक्यात पण सामाजिक उपक्रमातून साजरा करणार आहेत. त्यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) छत्री व टी शर्टचे आज शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर अनावरण करण्यात आले. पक्षाचे मशाल हे चिन्ह घराघरात पोहचविण्यासाठी याचा फायदा होईल, असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी व्यक्त करत कुलभुषण पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतूक केले.
शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने उबाठा गटाचे माजी उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्यातर्फे जळगाव शहरात १० हजार छत्री व टी शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. या छत्री व टी शर्टचे आज मातोश्रीवर अनावरण करण्यात आले. प्रसंगी उध्दव ठाकरे यांनी त्यांचे कौतूक केले. यावेळी सुनिल ठाकूर उपस्थित होते.
छत्री व टी शर्टवर बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, अदित्य ठाकरे व कुलभुषण पाटील यांचा फोटो व मशालीचे चिन्ह आहे. या माध्यतातून पक्षाचे नाव व चिन्ह घराघरात पोहचिण्यास मदत होईल. यावेळी बाळासाहेबांची २० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण ही शिकवण लक्षात ठेवून सामाजिक काम करत रहा. नागरिकांच्या मनात मशालच आहे, याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आलीच आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत यश आपलेच आहे, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी कुलभुषण पाटील यांचे कौतूक केले. तसेच जळगाव शहरात काम करत रहा, अशा सुचना देत राजकीय वाटचालीसाठी उद्भव ठाकरे यांनी आर्शिवाद दिले.
शिवसेनेचा आक्रमक चेहरा, विधानसभेला पारडे जड
कुलभूषण पाटील हे जळगाव शहरातील शिवसेनेचा तरुण आक्रमक चेहरा असून विद्यार्थी सेनेपासून शिवसेनेचे काम करत आहेत. उपमहापौर असतांना केलेल्या कामामुळे त्यांची शहरात चांगली ओळख निर्माण झाली आहे. पिंप्राळा उपनगरात त्यांनी रस्ते व इतर मूलभूत सुविधांचे जाळे विणले आहे. पिंप्राळातील त्यांनी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्यावेळी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले होते. यामुळे आगामी विधानसभेनिमित्त त्यांचे पारडे जड असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.