Social

भारतीय जवानांच्या मनोधैर्यासाठी अमळनेरमध्ये ‘आप’चा अनोखा उपक्रम

१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी लिहिली पत्रे, निबंध; रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनी जवानांपर्यंत पोहोचणार प्रेमाची भेट

भारतीय जवानांच्या मनोधैर्यासाठी अमळनेरमध्ये ‘आप’चा अनोखा उपक्रम

१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी लिहिली पत्रे, निबंध; रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनी जवानांपर्यंत पोहोचणार प्रेमाची भेट

अमळनेर:भारतीय स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन या पवित्र सणांचे औचित्य साधून अमळनेर तालुका आम आदमी पार्टीच्या (आप) वतीने सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजवण्यासाठी एक अत्यंत अनोखा व स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील शाळांमधील तब्बल १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी भारतीय जवानांच्या त्यागावर व धैर्यावर आधारित निबंध आणि पत्रलेखन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.आपले जवान सीमेवर अत्यंत बिकट परिस्थितीत अहोरात्र जागून देशाचे संरक्षण कसे करतात, त्यांच्या या त्यागामुळेच आपण देशात सुरक्षित राहू शकतो, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

विद्यार्थ्यांच्या लेखणीतून पाझरला देशप्रेमाचा सोहळा
या निबंध व पत्रलेखन स्पर्धेत अमळनेर शहरातील कन्या शाळा, साने गुरुजी हायस्कूल, जी. एस. हायस्कूल आणि के. डी. गायकवाड हायस्कूल या शाळांमधील इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनी आवर्जून भाग घेतला. जवानांच्या संघर्षाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना कागदावर उतरवल्या. “तुमच्यामुळेच आमचा प्रत्येक दिवस सुरक्षित आहे,” अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी सैनिकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.

क्षाबंधन व १५ ऑगस्टलाच सैनिकांना मिळणार विद्यार्थ्यांची ही अनोखी भेट!

विद्यार्थ्यांनी अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने लिहिलेले हे सर्व निबंध आणि भावुक संदेश रक्षाबंधन व १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिनी) थेट सीमेवर कार्यरत असलेल्या भारतीय सैनिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. “एक भाऊ-बहीण म्हणून आम्ही पाठवलेली ही छोटीशी भेट” या भावनेतून विद्यार्थ्यांनी हे संदेश लिहिले आहेत. सणासुदीच्या काळात कुटुंबापासून दूर असलेल्या जवानांना स्वातंत्र्यदिनी आणि रक्षाबंधनालाच आपल्या देशातील तरुण पिढीचे हे प्रेम व पाठिंबा मिळाल्याने त्यांचे मनोबल नक्कीच द्विगुणित होईल.
आम आदमी पार्टी अमळनेर तालुक्याच्या वतीने राबवण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी असे उपक्रम अत्यंत गरजेचे असल्याचे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button