मोटरसायकल चोरी करणारा चोरटा अमळनेर पोलिसांच्या ताब्यात.

अमळनेर (पंकज शेटे ) : दिनांक 03.08.2025 रोजी दुपारी 10:35 वाजेच्या दरम्यान अमळनेर तालुक्यातील दोधवद येथील श्री आनंदा दगा सैदाणे रा. दोधवद ता. अमळनेर हे अमळनेर शहरात किराणा करण्यासाठी आले होते, किराणा झाल्यानंतर आनंदा सैंदाणे हे दरबारसिंग राजपूत यांना बसस्थानकात सोडायला आले असता.त्याची गाडी बसस्थानक आवारातील शौचालयाकडे त्यांनी 10.35 वाजता मोटारसायकल लावली. त्यांची होंडा कंपनीची शाइन मोटरसायकल क्रमांक MH 19 DF 2363 ही लावली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली होती त्यावरून अंमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम साहेब यांनी अमळनेर यांच्या नेतृत्वात पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील उज्वल म्हस्के, जितेंद्र निकुंभे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील, प्रशांत पाटील , अशांना सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल व अज्ञात चोरटा शोधण्याचे आदेश व सूचना दिल्या.
पथकातील पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी अमळनेर शहरातील धुळे रोड परिसर व इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले तसेच गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून शेख रिजवान शेख सिराज वय 30 वर्ष रा इद्दु मुकादम चौक, रमजान पुरा मालेगाव जिल्हा नाशिक याने सदर मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला मालेगाव तालुका नाशिक येथून त्याच्या घरून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. वर नमूद आरोपी याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. रिमांड मध्ये असताना त्याला सदर चोरीस गेलेल्या मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने सदर मोटरसायकल ही चोरी करून मालेगाव येथे नेल्याची कबुली दिली.त्यानंतर सदर मोटरसायकल लपवलेल्या ठिकाणावरून हस्तगत करून जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील आणि पो.नितीन मनोरे करीत आहेत.
सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेतकर मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विनायक होते साहेब यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम साहेब यांच्या आदेश व सूचनेनुसार करण्यात आलेली आहे.
अमळनेर शहरात व परिसरातून आपली मोटरसायकल व इतर मालमत्ता चोरी जाऊ नये ती सुरक्षित राहावी यासाठी नागरिकांनी सतर्क व सजग राहण्याची सूचना पोलीस निरीक्षक निकम साहेबांनी दिली असून नागरिकांनी सतर्कतेची उपायोजना म्हणून आपले घर, ऑफिस, गोडाऊन व इतर महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आव्हान केले आहे.






