Social

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली केळी पिकाचे घसरलेले दरा बाबत बैठक संपन्न

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली केळी पिकाचे घसरलेले दरा बाबत बैठक संपन्न

जळगाव– जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्या केळी दर घसरणीचा मोठा फटका बसत असून, या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बुरहानपूरचे जिल्हाधिकारी दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी,आयुष प्रसाद म्हणाले, जिल्ह्यातील केळी ही मुख्यतः उत्तर भारतात जात असते सध्या उत्तर भारतात पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने जळगावमधील केळीचे बाजारभाव घसरले आहेत. त्याचबरोबर बुरहानपूर येथील काही व्यापारी संगनमत करून भाव पाडत असल्याच्या तक्रारी, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या असल्याचे, जिल्हाधिकारी बुरहानपुर यांच्या निदर्शनास आणून दिले व त्यावर उपयोजना करण्याची विनंती केली.

या संदर्भात बुरहानपूर जिल्हाधिकारी यांनी तातडीने काही महत्त्वपूर्ण उपाययोजना पुढील प्रमाणे जाहीर केल्या,
केळीच्या लिलाव प्रक्रियेवर सीसीटीव्ही अंतर्गत नजर ठेवण्यात येणार असून लिलावांचे यूट्यूब लिंकद्वारे थेट प्रसारण करण्यात येईल केळीचे
बोर्ड भाव जाहीर करताना कमीतकमी २० केळी भाव किमतीची सरासरी काढून बोर्ड भाव जाहीर करण्यात येतील तसेच बुऱ्हानपूर बाजार समितीच्या बाहेर होणाऱ्या केळी पिकांच्या खरेदी व विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी चेक पोस्ट स्थापन करण्यात येतील.
या उपाययोजनांमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळेल तसेच बाजारभाव स्थिर होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीस जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button