Other

अमृत योजना-2 मध्ये दिरंगाई; ठेकेदारावर कारवाईची मागणी

अमृत योजना-2 मध्ये दिरंगाई; ठेकेदारावर कारवाईची मागणी

भुसावळ: शहरातील अमृत योजना टप्पा-2 अंतर्गत दिलेल्या कामाला ठेकेदाराने वेळेत सुरुवात केली नसल्याने संबंधित ठेकेदाराचे कंत्राट रद्द करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी भुसावळ नगरपालिका प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना याबाबत निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, अमृत योजना टप्पा-2 साठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला. मात्र, पाच महिने उलटूनही कोणतेही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे ठेकेदाराची चौकशी करून त्याचे कंत्राट रद्द करावे आणि त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी सानप यांनी केली आहे.

भुसावळ नगरपालिकेने या मागणीची दखल घेतली असून, लवकरच संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी शक्यता आहे. नागरिकांमध्ये देखील या प्रकल्पाच्या दिरंगाईबद्दल नाराजी वाढली आहे, त्यामुळे प्रशासन ठेकेदाराला कठोर इशारा देण्याच्या तयारीत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button