कुसुंबा येथील शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल …

कुसुंबा येथील शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल …
जळगाव प्रतिनिधी I कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 49 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कुसुंबा येथे उघडकीस आले असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे,
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की लीलाधर पाटील वय 49 हे पत्नी आणि दोन मुलांचं कुसुंबा येथे शेती आणि मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कर्ज असल्याने ते या विभांचनेत असल्यामुळे रविवारी त्यांची पत्नी सविता पाटील या गावी गेल्या होत्या. तसेच त्यांचा मुलगा चेतन हा बाहेर खेळण्यासाठी केलेला असताना लीलाधर पाटील यांनी घरात एकटेच असताना गळफास घेऊन आत्महत्या केली
. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास चेतना घरी आल्यानंतर त्याला हा प्रकार आढळून आला. त्याने गळफास घेतल्याची गोष्ट त्याच्या काकाला सांगितली. त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने लीलाधर पाटील यांना खाली उतरवून तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. हॅलो याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान लीलाधर पाटील यांच्या पश्चात आई ,दोन भाऊ, तीन बहिणी, पत्नी आणि मुलगा मुलगी असा परिवार आहे.