Crime

शहरातील अट्टल गुन्हेगारांचे ‘त्रिकूट”दोन वर्षांसाठी हद्दपार

जळगाव : खून,मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तुकाराम वाडी परिसरात राहणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांवर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपारची कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (वय २३), पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर (वय २३) व आकाश उर्फ आक्या ब्रो रविंद्र मराठे (वय २२, सर्व रा. तुकारामवाडी) असे या तिघांचे नाव असून त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

शहरात वाढणारी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी अशा अट्टल गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. , तुकाराम वाडी परिसरातील आकाश उर्फ खंड्या ठाकूर याच्यावर सात, पवन उर्फ बद्या बाविस्कर याच्याविरुद्ध सहा तर आकाश उर्फ आक्या ब्रो मराठे याच्याविरुद्ध खूनासह चार गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठविला होता.

त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी  तिघांच्या हद्दपारीचे आदेश पारित होताच, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक राहूल तायडे, चंद्रकांत धनके, योगेश बारी, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश घुगे यांच्या पथकाने तिघांना जिल्ह्यातून हद्दपार केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button