Other

पराक्रम दिना’निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन*l

‘पराक्रम दिना’निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन*l

१ ते १५ ऑगस्टदरम्यान स्पर्धा; विद्यार्थी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव :महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धांमध्ये शालेय, महाविद्यालयीन तसेच खुल्या गटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. निबंध स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी, वक्तृत्व स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी, तर रिल्स स्पर्धा महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे स्वरूप, विषय, नियमावली, बक्षिसे तसेच सहभाग नोंदणीसंदर्भातील माहिती https://parakramdin.mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशिका स्वीकारण्याचा कालावधी १ ते १५ ऑगस्ट २०२६ असा असून, राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच इच्छुक नागरिकांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अमृत’ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button