Other

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात व भक्तिभावाने साजरी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात व भक्तिभावाने साजरी

जळगाव प्रतिनिधी दि. २९ जुलै २०२६ रोजी गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय, जळगाव येथे गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिभाव, आदर आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.* या कार्यक्रमास अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र सण असून, हा दिवस महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या, ज्ञान, संस्कार आणि मूल्ये देणाऱ्या प्रत्येक गुरूप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.* भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च मानले गेले असून, गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच व्यक्तीचे जीवन उज्ज्वल आणि यशस्वी बनते. संपूर्ण कार्यक्रमात भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा गौरव, ज्ञानाची महती आणि गुरुजनांविषयी कृतज्ञतेची भावना प्रकर्षाने व्यक्त झाली. गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून कार्यक्रमास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर *महर्षी वेदव्यास तसेच गोदावरी आजी, ज्यांच्या प्रेरणेतून गोदावरी फाउंडेशन व संस्थेची स्थापना झाली, यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.* या महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा व आदर्शांचा स्मरण करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली.

त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. यामध्ये *प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.*

त्यानंतर *विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व, गुरु-शिष्य परंपरा, शिक्षकांचे समाजातील योगदान आणि जीवनातील गुरुंचे स्थान याविषयी प्रेरणादायी मनोगते व्यक्त केली. यामध्ये जिज्ञासा पाटील, श्रद्धा मराठे, प्रथम पाटील, मृणाली भालेराव, सृष्टी पाटील, वृशिका माहुरकर, वैष्णवी चौधरी, कांचन सोनवणे, धनश्री पाटील, विनीत पाटील, तेजस्विनी उगळे, अंकिता घाटे, सोनम गुंजाळ आणि हर्षल खर्चे यांनी प्रभावी भाषणे सादर केली.* विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण व विचारप्रवर्तक भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी *अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट भाषणांचे कौतुक केले. त्यांनी शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, गुरु केवळ ज्ञान देत नाही तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करून त्यांना जबाबदार, सुसंस्कृत आणि नैतिक मूल्यांनी परिपूर्ण नागरिक बनवितो.* विद्यार्थ्यांनी आयुष्यभर शिकत राहावे आणि गुरुंच्या मार्गदर्शनाचा सदैव आदर करावा, असे त्यांनी आवाहन केले.

यानंतर *प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणांचे विशेष कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी, दररोज स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी, स्वतःतील कमतरता दूर करून अधिक सक्षम व परिपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी प्रेरित केले.* तसेच भविष्यातील विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये आत्मविश्वासाने सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिनानिमित्त गुरुपौर्णिमा साजरी केली जाते, यामागील ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करत त्यांच्या वेदांचे संकलन, महाभारत रचना आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील अमूल्य योगदानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, शिस्त, संस्कार आणि सातत्यपूर्ण आत्मविकासाची प्रेरणा जागवली.

कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. *कार्यक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल प्रा. नकुल गाडगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी मराठे, द्वितीय वर्ष तंत्रनिकेतन (संगणक अभियांत्रिकी) या विद्यार्थिनीने अत्यंत प्रभावीपणे केले.*

या कार्यक्रमास अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, गुरुजनांप्रती आदर, कृतज्ञता, ज्ञानाची उपासना आणि आत्मविकासाचा संदेश देणारा हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील.

सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल *गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ.वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), डॉ. वैभव पाटील सर (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील सर यांनी कौतुक केले.*

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button